राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२० बोलीभाषा आणि बहुभाषिकतेचा परिणाम
डॉ. व्यंकट बाबूराव सूर्यवंशी
सामाजिक विज्ञान एवं मानविकी शिक्षा विभाग
क्षेत्रीय शिक्षा संस्थान एनसीईआरटी, भोपाळ
venkatsuryawanshi21@gmail.com 8888230551
प्रस्तावना
भाषा हा शिक्षणाचा पाया असल्यामुळे मानवी जीवनात भाषेला महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या भावना भाषेच्या माध्यमातून प्रकट करण्याचे आणि माहिती व कोशल्ये शिकण्याचे भाषा हे एक साधन आहे. भाषेमुळेच सामाजिक व्यवहार, संभाषण करणे, आपल्या मनातील विचार भावना व्यक्त करण्यासाठी भाषा हे एक माध्यम आहे. भाषा ही मानवाची स्वतंत्र निर्मिती आहे.
सुरूवातीच्या काळात हावभावाची भाषा अस्तित्वात होती. यात तो हावभाव करणे, हातवारे करणे याबरोबरच चेहऱ्याच्या भाषेद्वारे संभाषण करत होता. जेव्हा मानव एकटा रहायचा तेव्हा त्याला भाषेची गरज पडली नाही. मात्र जेव्हा तो एकमेकांच्या संपर्कात येऊ लागला तेव्हा मानवाला भाषेची गरज पडली. भाषेची निर्मिती झाली तेव्हापासून मानव विचार करू लागला.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2508S01V13P010
Download