पर्यावरणीय संवेदन आणि मराठी साहित्य
डॅा राजीव के. आरके,
बं.नं.१०, चंद्रवेल हाऊसिंग सोसायटी,फेज-१, यशवंत विनय शाळेच्या बाजूला, वलवाडी शिवार, नकाणे रोड, देवपूर , धुळे पिन ४२४००२.(महाराष्ट्र) 8625040196/8830116787.
मानवी जीवनासंदर्भात ‘परिसर‘ ही अत्यंत अर्थपूर्ण आणि अपरिहार्य अशी संकल्पना आहे. अपरिहार्य या अर्थाने की मानवाच्या एकंदरच जगण्यावर ती अत्यंत प्रभाव टाकत असते .मानवाची जी सर्वंकष जडणघडण होते तीच परिसराच्या बहुमितीय प्रभावांतून होत असते. मानवाची जैविक घडून ही व्यापकार्थाने नैसर्गिक बाब असली ,तरी त्याची शारीरिक व सांस्कृतिक घडणही परिसराच्याच संदर्भाने होत असते. प्रत्येकच परिसर हा वैशिष्ट्यपूर्ण असतो .कारण तो परिसर एक वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरण राखून असतो .त्या परिसराचे प्राकृतिक स्थान, भौगोलिक रचना ,नद्या ,नाले डोंगर ,शेतीपाती, जंगल ,झाडे- झुडपे पशुपक्षी कीटक ,सरीस्रुप इत्यादी घटकांचे अस्तित्व त्या परिसराला वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरण बहाल करीत असते. कोणताही मानव हा त्या विशिष्ट परिसराच्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग असतो .मानवाच्या संदर्भात हे पर्यावरण जसे अपरिहार्य असते तसे अर्थपूर्णही असते. कारण मानवाचे जगणे हे पर्यावरणाच्या अनुषंगाने अर्थपूर्ण ठरत असते .केवळ जगणेच नव्हे ,तर मरणेही पर्यावरणाच्या अनुषंगाने अर्थपूर्ण ठरणारे असते. मानवाच्या जीवनानुभवांची इतिकर्तव्यता परिसर व त्या परिसराच्या पर्यावरणातच सिद्ध होत असते .म्हणून पर्यावरण हा मानवी जीवनाचा भाग नाही ,तर मानवी जीवन हेच पर्यावरणाचा भाग असते. ‘जसे पर्यावरण तसा माणूस ‘यातून माणूस आणि पर्यावरण यांचे साहचर्य अधोरेखित होते.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2503I01S01V13P0011
Download