जागतिकीकरण आणि मराठी वैदर्भीय कथा (सदानंद देशमुख यांच्या कथा साहित्याच्या संदर्भात)

जागतिकीकरण आणि मराठी वैदर्भीय कथा

(सदानंद देशमुख यांच्या कथा साहित्याच्या संदर्भात )

मार्गदर्शक

प्रा. डॉ. सोपानदेव विठोबाजी पिसे

सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा, नागपूर

संशोधक विद्यार्थी

वर्षा रवींद्र पाटील

स्नातकोत्तर मराठी विभाग

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

सारांश  :

                    जागतिकीकरणानंतरच्या मराठी वेदर्भीय कथेने मध्यमवर्गीयांचे त्यांच्या कल्पनेपलीकडचे विश्व साकारले आहे.  ’खाऊजा ‘ संस्कृतीचा वाढता प्रभाव , मोडकळीस आलेली कृषी व्यवस्था ,खेड्यांचे झालेले शहरीकरण, सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांचा झालेला ऱ्हास याचे चित्रण सदानंद देशमुख यांच्या कथेतून दिसून येते. ढासळलेली कुटुंब व्यवस्था व एकटा पडलेला माणूस, खेड्यातील लोकांचे शहराकडे होणारे स्थलांतरण, यामुळे भकास पडलेली खेडी शहरातील चंगळवादाने प्रभावित झालेला तरुण वर्ग ,भौतिक सुख सोयीमुळे माणसाला आलेले एकाकीपण याचे वर्णन त्यांनी आपल्या कथेतून केले आहे. कुटुंबातील व समाजातील वाढत्या सत्ता संघर्षामुळे पीडित असलेला माणूस त्यांच्या कथेच्या केंद्रस्थानी आहे. स्त्रियांचे प्रश्न, कृषी जीवनातला प्रश्न आणि कोसळता गावगाडा यांचे वास्तव चित्रण सदानंद देशमुख यांच्या कथेतून आलेले आहे.

बीज शब्द : जागतिकीकरण, भांडवलशाही, अर्थव्यवस्था, चंगळवाद, भोगवादी

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2503I01S01V13P0007

Download